Chandrashekhar Bawankule | संजय राऊत आंघोळीचा साबण काँग्रेसचा तर पावडर राष्ट्रवादीची वापरतात तर राणे त्यांना धुवून काढतात – चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule | सोलापूर: सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ता संघर्षाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहे. अशात चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे.
आमचे राणे संजय राऊतांना धुवून काढतात, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे. बोलताना बावनकुळे म्हणाले, “संजय राऊत आंघोळीचा साबण काँग्रेसचा वापरतात. तर पावडर राष्ट्रवादीची वापरतात. मात्र, आमचे नितेश राणे त्यांना धुवून काढतात.”
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत संजय राऊत म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकार तीन महिन्यात कोसळणार आहे. कारण हे सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आधी 16 आमदारांना घरी जावं लागणार आहे. त्यानंतर 24 आमदारही घरीच बसणार आहे. या सरकारचा अंत जवळ आला आहे. बेकायदा सरकारचा मृत्यू अटळ आहे.”
पुढे बोलताना राऊत म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्लज्जपणाचा निर्णय कोर्टाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारच्या चुका दाखवल्या आहेत, आमच्या नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सरकारचे नियम पाळू नये.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकार 3 महिन्यात कोसळणार” ; संजय राऊतांची भविष्यवाणी
- Uddhav Thackeray | “… तोपर्यंत राज्यपाल पद रद्द करावं”; उद्धव ठाकरेंची मागणी
- Ajit Pawar | बाबारे- काकारे-मामारे करत बसतात; अजित पवारांनी सुषमा अंधारेंना खडसावलं
- Weather Update | राज्यात मोचा चक्रीवादळाचा धोका वाढला, ‘या’ भागात वादळी पावसाचा इशारा
- Maharashtra Political Crisis | …म्हणून उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेबद्दल बोलू नये; माधव भंडारींची ठाकरेंवर टीका
Comments are closed.