Devendra Fadnavis | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
Devendra Fadnavis | मुंबई : राज्य सरकारने (Maharashtra Government) अखेर कापूस उत्पादक शेतकऱ्यांची हाक ऐकली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी ही आनंदाची बातमी त्यावेळी दिली आहे. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत शेतकऱ्यांच्या लाँग मार्चबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं.
शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी कांदे उत्पादक शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली. राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान दिलं होतं. पण सरकारने यामध्ये आणखी 50 रुपयांची वाढ केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Devendra Fadnavis gave good news for cotton farmers
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. त्यांनी महाराष्ट्रात अमरावतीत मेगा टेक्स्टाईल पार्कला मान्यता दिली. मागच्या काळात हा प्रस्ताव आम्ही पाठवला होता. आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली होती. आता टेक्स्टाईल पार्क मंजूर झालाय. मागच्या काळात आपण अमरावतीत टेक्स्टाईल पार्कची इको सिस्टिम आधीच तयार केली आहे. एक मोठा टेक्सटाईल झोन तयार केला आहे. अनेक कंपन्या तिथे आल्या आहेत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
अमरावती येथे ‘पीएम मित्र’ मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल माननीय प्रधानमंत्री @narendramodi जी यांचे मनःपूर्वक आभार. या निर्णयामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात मोठे प्रकल्प गुंतवणुकीसाठी येऊन रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. https://t.co/fsIdLuUdfc pic.twitter.com/46959NuROD
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 17, 2023
“आता हा टेक्सस्टाईल पार्क आल्याने दहा हजार कोटींची गुंतवणूक, एक लाख लोकांना थेट आणि दोन लाख लोकांना अप्रत्यक्षपणे असा तीन लाख लोकांना रोजगार मिळेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समृद्धी येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सगळा आपला कॉटन बेल्ट आहे. त्यामुळे हा पार्क आल्यानंतर आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनादेखील त्याचा फायादा मिळेल. खरं म्हणजे या पार्कमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बदलण्याकरता देखील मोठी महत्त्वाची मदत होणार आहे. म्हणून मी पंतप्रधान मोदी यांचे मनापासून राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो”, असं फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Nana Patole | “राज्यात ट्रोलिंगसाठी भाड्याचे टट्टू सत्ताधाऱ्यांनी बसवलेत”; सरन्यायाधिशांना ट्रोल करण्यावर नाना पटोलेंची जहरी टीका
- H3N2 | धक्कादायक! पुण्यात H3N2 विषाणूचे 15 दिवसात 46 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू; महापालिकेचे सतर्कतेचे आवाहन
- Ajit Pawar | “कृषीमंत्री असे अकलेचे तारे तोडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात”; अजित पवारांची अब्दुल सत्तारांवर ताशेरे
- Sanjay Raut | “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मख्खमंत्री, खरे चालक तर देवेंद्र फडणवीस”; संजय राऊतांची बोचरी टीका
- Budget Session 2023 | “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना काहीच गांभीर्य नाही, हा महाराष्ट्राचा, जनतेचा अपमान”; विरोधी पक्षाची सरकारवर आगपाखड
Comments are closed.