सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे संजय राऊतांचे नवे नेते : फडणवीसांचा टोला

नाशिक : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसला वगळून भाजपविरोधात एक सक्षम पर्याय उभा करावा लागेल, असे विधान ममता बॅनर्जी यांनी केले होते. यावरून शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यात आली असून काँग्रेसला सक्षम विरोधीपक्ष असल्याचे म्हटले आहे.
त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांचे नेतेच बदलल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता टीका केलीय. सामना आणि सामनाच्या संपादकाचे केद्र बिंदू बदलले आहेत.
सुरवातीला त्यांचे नेते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होते, त्यानंतर पुढे त्यांचे नेते माननीय शरद पवार साहेब होते, आणि आता अलीकडच्या काळात त्यांचे नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी झाले आहेत. तसेच ते काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखे बोलतायत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा जन्मभर प्रखर विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून हे लोक बसलेत. मला वाटतं तिच प्रचिती त्यांच्या सामानाच्या अग्रलेखातून दिसत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
- साहित्य संमेलनाला सावरकरांचे नाव देऊ नये, म्हणून कुसुमाग्रज यांचे नाव दिले; फडणवीसांचा गौप्यस्फोट
- फडणवीसांच्या रडगाण्याशी आम्हाला घेणेदेणे नाही, विनायक राऊतांचा टोला
- ‘कोण आहेत राहुल गांधी’ मी त्यांना ओळखत नाही, असदुद्दीन ओवैसींचा काँग्रेसवर घणाघात
- काँग्रेसला डावलणं म्हणजे फॅसिस्ट वृत्तीला बळ देण्यासारखं, थोरातांची ममतांवर टीका
- “पवारांनी स्वतः बोलण्याऐवजी ममता बॅनर्जींच्या तोंडी ‘ते’ वक्तव्य घातलं”