राज्यपालांनी अभिभाषण न करता सभागृहातून जाणे, हा महाराष्ट्राचा अपमान : आदित्य ठाकरे
मुंबई : आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झालीय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणाला सुरवात केली तेव्हा सभागृहात सत्ताधारी सदस्यांनी राज्यपालांचा निषेध केला. शिवाजी महाराज की’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. राज्यपालांना राष्ट्रगीतासाठी दोन वेळेस माईकवरून आमदारांना विनंती केली.
यानंतर राष्ट्रगीतानंतर त्यांनी अभिभाषणास सुरवात केली. तेव्हा पुन्हा घोषणाबाजी सुरु झाली. कोश्यारी यांनी दोन वाक्य पूर्ण करुन आपले भाषण संपवलं. ते फाईल बंद करुन राजभवनाच्या दिशेला निघून गेले. अवघ्या 22 सेकंदात राज्यपालांनी आपले भाषण आवरत पटलावर ठेवले. त्यामुळे सभागृहातील उपस्थित अचंबित झाले. सत्ताधारी पक्षाने ‘राज्यपाल हटाव’ अशा घोषणा यावेळी दिल्या.
मात्र आजच्या या घडामोडीमुळे आगामी काळात सत्ताधारी विरुद्ध राज्यपाल संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे. आदित्य ठाकरे यांनी घडलेल्या प्रकारावरून खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. हा महाराष्ट्रचा अपमान झाला आहे. राज्यपालांनी असं निघून जाणे, त्यांच्या भाषणावेळी त्यांचा अपमान होणे हे सर्व अयोग्य आहे. आम्हाला या गोष्टींमुळे धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सत्ताधारी आमदारांचा गोंधळ, राज्यपालांनी दोन मिनिटांत अभिभाषण गुंडाळले!
- ‘आज बाळासाहेब ठाकरे असते तर एका मिनिटात मलिकांना मंत्रिमंडळातून काढून टाकले असते’
- ‘दाऊद के दलालो को… को जूते मारो सालों को,’ ‘नवाब मलिक कौन है?…’; भाजपाने दिल्या घोषणा
- सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजलं, ते आता आमच्यावरच फुत्कारतंय : उद्धव ठाकरे
- …म्हणून युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले सुरू झाले; शरद पवारांनी सांगितलं कारण
You must log in to post a comment.