मी कधीच शेतकऱ्यांची माफी मागणार नाही : कंगना राणौत
मथुरा : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यातच आपण कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, मात्र मी देशहितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा प्रचार करणार आहे, असं कंगनाने शनिवारी मथुरेत म्हटलंय. मथुरेत श्रीकृष्ण जन्मस्थानाला भेट दिल्यानंतर कंगनाने पत्रकारांशी संवाद साधला.
२०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आपण भाजपाचा प्रचार करणार का, असे विचारले असता कंगना म्हणाली, “मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. जे देशहितासाठी काम करत आहेत, त्यांच्यासाठी मी प्रचार करेन.” तसेच पुढे तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागणार का असा प्रश्न विचारला असता, कंगना म्हणाली कि, मी कधीच माफी मागणार नाही आणि मी माफी का मागावी. शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलले म्हणून मी माफी मागावी का? तर मी माफी मागणार नाही. तुम्ही मीडियावाल्यांनी मला दाखवा कि मी कधी कुठे माफी मागितली आहे का? असं कंगना यावेळी म्हणाली.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लोकांना भगवान श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष जन्मस्थान पाहता यावे, यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा कंगनाने व्यक्त केली. भगवान कृष्णाचा जन्म ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी एक ईदगाह आहे, असा दावाही यावेळी कंगनाने केला.
Kangana Ranaut says she doesn't belong to any party, but will campaign for nationalists
Track latest news updates here https://t.co/jjM3F2D1ND pic.twitter.com/4ZB0qY8nlh— Economic Times (@EconomicTimes) December 4, 2021
महत्वाच्या बातम्या
- आदित्य ठाकरेंनी आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत!
- सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे संजय राऊतांचे नवे नेते : फडणवीसांचा टोला
- साहित्य संमेलनाला सावरकरांचे नाव देऊ नये, म्हणून कुसुमाग्रज यांचे नाव दिले; फडणवीसांचा गौप्यस्फोट
- फडणवीसांच्या रडगाण्याशी आम्हाला घेणेदेणे नाही, विनायक राऊतांचा टोला
- ‘कोण आहेत राहुल गांधी’ मी त्यांना ओळखत नाही, असदुद्दीन ओवैसींचा काँग्रेसवर घणाघात