“मी पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा ठोकणार, कारण त्यांची लायकी कोट्यावधींची नाही”
मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर शाब्दिक यौद्ध सुरु आहेत. सुरवातीला किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील मंत्र्यांना धारेवर धरलं आहे. त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब आणि आता हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एकीकडे हा वाद सुरु असताना माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे अनंत गीते यांनी सेना नेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे.
दोन्ही काँग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर शिवसेना आणि काँग्रेस कदापि एक होऊ शकत नाहीत, असं अनंत गीते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळात काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय, असा घणाघात गीते यांनी यावेळी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत, महाविकास आघाडी सरकार ही केवळ सत्तेसाठी केलेली तडजोड आहे, असं म्हणत अनंत गीते यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहे. कारण पाटलांची लायकी कोट्यवधी रुपयांची नाही. त्यांची किंमतच केवळ सव्वा रुपया आहे, असं म्हणत राऊतांनी तिखट शब्दांत पाटलांवर पलटवार केला आहे. पाटलांनी जे म्हटलंय त्या संदर्भात त्यांना पुढच्या चार दिवसांत कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे, असंही संजय राऊतांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या
- सामनाचा ‘दिलदार’पणा, चंद्रकांत पाटलांनी अग्रलेखाला दिलेलं उत्तर जसंच्या तसं छापलं!
- “…त्यामुळे आता संजय राऊतांनी राजकारण सोडावं”
- खंजीर हा शिवसेना व राष्ट्रवादीमधील समान दुवा; भाजपचा टोला
- महात्मा गांधी जयंतीला कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी करणार काॅंग्रेसमध्ये प्रवेश
- कोरोना आपल्या जन्माच्या आधीपासूनच होता : उदयनराजे भोसले
You must log in to post a comment.