IND vs BAN | बांगलादेशविरुद्ध कुलदीप यादवने केला ‘हा’ पराक्रम

IND vs BAN | चट्टोग्राम: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) या दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. सध्या या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने बांगलादेश विरुद्ध आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. तर, या सामन्यातील बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवर थांबला. या सामन्यांमध्ये भारतीय संघातील गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ने महत्त्वाचे योगदान दिले. या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत कुलदीपने आपल्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली आहे.

भारतीय संघाने या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत 133.5 षटकांमध्ये 404 धावा केल्या. यामध्ये श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा आणि रविचंद्र अश्विनी यांनी अर्धशतके केली. त्याचबरोबर ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांनी देखील अनुक्रमे 46 आणि 40 धावांचे योगदान दिले. दरम्यान, भारतीय संघाने बांगलादेशचा पहिला डाव 55.5 शतकामध्ये आटोपला. यामध्ये भारतीय संघाने बांगलादेशला सर्वबाद करत 150 धावांवर थांबविले. यामध्ये कुलदीप यादवने भारतासाठी सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.

बांगलादेश येथील चट्टोग्राम मैदानावर पाच विकेट घेणारा कुलदीप यादव हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. या सामन्यामध्ये कुलदीपने 16 षटके गोलंदाजी करत चाळीस धावा दिल्या असून पाच विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने मशफिकुर रहिम, शाकिब अल हसन, नुरूल हसन, तैजुल इस्लाम आणि इबादत हुसेन यांना पव्हेलियनला पाठवले. भारताकडून चट्टोग्राम मैदानावर पाच विकेट्स घेणारा कुलदीप यादव पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

पहिल्या डावामध्ये भारतीय संघाने 256 धावांची आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाला देखील सुरुवात झाली आहे. यामध्ये भारतीय संघाने 25.2 षटकानंतर एक बाद 77 धावा केल्या. यामध्ये कर्णधार के एल राहुल 23 धावा करत बाद झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.