Jayant Patil। बच्चू कडू यांनी खोके घेतले की नाही हे त्यांना सिद्ध करावे लागेल; राणांच्या आरोपानंतर पाटलांचं आव्हान
Jayant Patil। मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) याच्या वाद सुरु आहे. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर, शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत, असे आव्हान दिले होते. यानंतर आता 1 नोव्हेंबरपर्यंत या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर मोठा बॉम्बच फोडणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिला आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील यांची प्रतिक्रिया –
यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले कि, बच्चू कडू यांच्यासाठी मंत्री पद महत्वाचा विषय गौण आहे, त्यांनी खोके घेतले की नाही हे त्यांना सिद्ध करावे लागेल. त्यातून ते क्लीन होऊन बाहेर येणं महत्वाचे आहे, असं म्हणत पाटील यांनी कडू यांना चिमटा काढला. बच्चू कडू यांनी 1 तारखेपर्यन्त राणा यांना मी खोके घेतले की नाही हे सिद्ध करण्यासाठी वेळ दिला आहे. त्यावरूनच बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया –
एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत मोठा दावा केला आहे. राज्यातील अपक्ष आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. बच्चू कडू यांनी त्याची सुरुवात केली असल्याचे खडसे म्हणाले. बच्चू कडू म्हणतात की, माझ्यासोबत सात ते आठ आमदार आहेत आणि आता सात आठ आमदार घेऊन ते बाहेर पडतात का हीच परिस्थिती शिंदे यांच्यासह असलेल्या 50 60 आमदारांची असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही त्यामुळे अनेक आमदार अस्वस्थ आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार न झालेले अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. त्यापैकीच एक बच्चू कडू पण आहेत. बच्चू कडू यांचे मंत्रिमंडळामध्ये नाव आहे. बच्चू कडू यांच्याबरोबर आणखी सुद्धा आमदार येण्याची शक्यता नाकारता येत नाही असा अंदाज ही त्यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Eknath Khadse । बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादात एकनाथ खडसेंची उडी, म्हणाले…
- Chandrakant Khaire । “अब्दुल सत्तार यांना गाडल्याशिवाय राहणार नाही”; चंद्रकात खैरे आक्रमक
- Sachin Sawant । “गुजरातच्या हितासाठी देशात सध्या तीन सरकार कार्यरत आहेत”; सचिन सावंतांचा खोचक टोला
- Chhagan Bhujbal । “आता महाराष्ट्रातील तरुणांनी काय करायचं?, आरती करा, हनुमान चालीसा करा, मोर्चे करा…”; छगन भुजबळ संतापले!
- Maharashtra । शिंदे-फडणवीस सरकारच्या ३ महिन्यांच्या काळात महाराष्ट्राने ‘हे’ ४ मोठे प्रकल्प गमावले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.