मराठा महासंघ आणि संभाजी ब्रिगेडने केली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या राजीनाम्याची मागणी

पंढरपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडण्याची चिन्हं आहेत. औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोश्यारी बोलत होते.
यावेळी बोलताना कोश्यारी यांनी म्हटलं की, चाणक्याविना चंद्रगुप्तांना कोण विचारेल? समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारणार? असं राज्यपालांनी म्हटलं आहे. गुरुचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे, असंही ते म्हणाले होते. या वादग्रस्त विधानावरून राज्यातील वातावरण तापलं आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपात अखिल भारतीय मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड आणि मराठा संघटनांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पंढरपूरमधील याबाबतच्या आंदोलनामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, मराठा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या
- युक्रेन-रशियामध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी शरद पवार आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यात चर्चा
- छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाल्याचा पुरावा नाही; सुप्रिया सुळेंनी दिला दाखला
- “राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे”, उदयनराजेंचा इशारा
- ‘समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’ राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
- ‘समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’, राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य