Ram Kadam | “…तोपर्यंत मी डोक्यावरचे केस कापणार नाही”; राम कदम यांनी घेतली शपथ
Ram Kadam | मुंबई : भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी मुंबई महानगरपालिकेवर आरोप केले आहेत. मुंबई मनपाच्या निष्काळजीपणामुळं पाणी मिळत नसल्याचं ते म्हणालेत. तसाच तुटवडा घाटकोपरच्या डोंगराळ भागात असल्याचं त्यांनी सांगितलं.
“माझा घाटकोपर पश्चिम हा मतदारसंघ डोंगराळ आहे. लोकसंख्या वाढली. सिंगल घराची डबल घरं झाली. अनेकांनी स्वतःची घरं पाण्याविना चालवावं लागतंय”, अशी व्यथा राम कदम यांनी मांडली.
त्याचबरोबर मुंबईत महापालिकेच्या निष्काळजीपणामुळं पाण्याचा तुटवडा आहे. लोकं निवडून देतात. पण, तरीसुद्धा त्यांना मुबलक पाणी देऊ शकत नाही. तर मग निवडून येण्याचा उपयोग काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी बोलताना त्यांनी डोंगरावरच्या प्रत्येक घराला मुबलक पाणी मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याचे केस कापणार नाही, अशी शपथ घेतली आहे. मुंबई मनपाच्या निष्काळजीपणामुळं पाणी मिळत नाही. त्यामुळं आमचं सरकार आहे. मंत्री महोदयांचा पाठपुरावा करून घेऊन मी ते उपलब्ध करून घेणार आहे. पण, नैतिक जबाबदारी म्हणून मी ही शपथ घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- Savitribai Phule Memorial | सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा
- Coronavirus । चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; अदार पूनावाला यांनी दिला ‘हा’ सल्ला
- Devendra Fadnavis | “कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कृती दल” ; देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- Grampanchayat Election 2022 | संदीपान भुमरेंना मोठा धक्का! सरपंच पदाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर, ठाकरे गटाचा मोठा विजय
- Raj Thackeray | सगळे शेफारले, तर आधी राजीनामा द्या ; राज ठाकरेंचा मनसैनिकांना इशारा!
Comments are closed.