Sambhaji Chhatrapati | “राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा”; कोश्यारींच्या ‘त्या’ वक्तव्यावर संभाजी छत्रपती संतापले
Sambhaji Chhatrapati | मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आज मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Maharaj) केली आहे.
यामुळे आता एक नवी वाद सुरु झालाय. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करत विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. माजी खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनीही राज्यपालांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
ते म्हणाले, “राज्यपाल असं का बडबडतात मला माहीत नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या, असं मी परवा सुद्धा म्हटलं होतं. मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, प्लीज प्लीज अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला.” शिवाजी महाराज , इतर महापुरुष असतील किंवा संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात? असा सवाल संभाजी छत्रपती यांनी केला आहे.
काय म्हणालेत भगतसिंह कोश्यारी?
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.” तसेच “शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Urfi Javed | उर्फीची अतरंगी फॅशन! कापडाचा सोडून मोबाईलचा बनवला ड्रेस
- Bhagatsingh Koshyari । “शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श, मी नव्या युगाविषयी…”; भगतसिंह कोश्यारींचं वक्तव्यं पुन्हा चर्चेत
- Sandipan Bhumre | “अंधारे पैठणमध्ये संध्याकाळी आल्या, त्यांना काय…”, संदीपान भुमरेंचा सुषमा अंधारेंवर पलटवार
- Best Mileage Bike | ‘या’ आहेत देशातील सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या बाईक
- Sanjay raut | “…अन्यथा भारताचा पाकिस्तान झाला असता”, संजय राऊतांचा हल्लाबोल
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.