Shivrajyabhishek Sohala | किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा! गडावर लाखो मावळ्यांची उपस्थिती

Shivrajyabhishek Sohala | रायगड: आज तारखेनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. किल्ले रायगडावर शिवभक्त हा उत्सव जल्लोषात साजरा करताना दिसत आहे. हा सोहळा साजरा करण्यासाठी रायगडावर तब्बल अडीच लाखापेक्षा अधिक मावळे एकत्र आले आहे. ढोल ताशांच्या गजरामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. ‘Jai Bhawani Jai Shivaji’ ‘जय भवानी जय शिवाजी’ या … Read more

T. Raja Singh | “शिवाजी महाराज आणि औरंगजेब हे…”; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजप आमदारावर गुन्हा दाखल

T. Raja Singh | लातूर : तेलंगणा राज्यातील भाजपचे एकमेव आमदार टी. राजासिंग (T. Raja Singh) यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी लातूर पोलिसांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून आक्षेप नोंदवला जात आहे. छत्रपती … Read more

Sanjay Raut | “देशात अजूनही न्याय जिवंत, सत्याचाच विजय”; दोन्ही युक्तीवादानंतर राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. शिंदे आणि ठाकरे गटाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार? यावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या प्रकरणातील निकाल सर्वोच्च … Read more

Sanjay Raut | “औरंगाबादचे नामांतर करण्याची हिंमत त्यांच्यात नाही”; राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut | मुंबई : राज्यात काही शहरांच्या नामांतरावरुन मोठं राजकारण झालं. त्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये टीका-टिपण्णीही झाली. उस्मानाबाद शहराचे धाराशीव नामकरण करण्यास केंद्र सरकारने ‘ना हरकत पत्र’ दिले असून, औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्राच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी … Read more

Sanjay Raut | “शिवरायांनी गद्दारांचा कोथळा काढल्याचं शिकलात तरी…” संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Sanjay Raut | नाशिक : राज्यात गेल्या काही महिन्यात देव, साधूसंत आणि थोर महापुरुषांबाबत राज्यातील राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यं केली गेली. त्यावरुन राज्यात संतापाची लाट उसळली. विरोधकांकडून टीका करण्यात आली. आंदोलने, निषेध केला गेला. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यभरात सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली … Read more

BJP | जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस; राज्यात भाजप पदाधिकाऱ्याची घोषणेची चर्चा

BJP | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. ‘अफजलखान आणि शायिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत’, असं वक्तव्य आव्हाडांनी केलं होतं.  त्यांच्या याच वक्तव्यावरुन विरोधकांकडून सडकून टीका करण्यात आली आहे. आव्हाडांविरोधात आंदोलने करण्यात आली. त्यांच्या प्रतिक्रात्मक पुतळ्यांचे दहनही करण्यात … Read more

Jitendra Awhad | “काहीही झालं तरी ‘त्या’ वक्तव्यावरून माघार नाही”; जितेंद्र आव्हाड वक्तव्यावर ठाम

Jitendra Awhad | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन विरोधकांकडून सडकून टीका करण्यात आली. आव्हाडांविरोधात आंदोलने करण्यात आली. त्यांचे प्रतिक्रात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. आव्हाडांच्या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटलेले असतानाही आता जितेंद्र आव्हाडांनी आपल्या वक्तव्यावर ठाम … Read more

Vinod Tawde | “जितेंद्र आव्हाडांचं लॉजिक…”; आव्हाडांच्या वक्तव्यावर विनोद तावडेंची प्रतिक्रिया

Vinod Tawde | मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखानावर केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या वक्तव्याचा आक्षेप व्यक्त करत राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यातील सभेत बोलत असताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. “शाहिस्तेखान, औरंगजेब आणि मुघल … Read more

Jitendra Awhad | “मी जे बोललो त्याचे संदर्भासहित…”; छत्रपती शिवरायांबाबत वक्तव्यानंतर आव्हाडांचं आणखी एक ट्वीट

Jitendra Awhad | मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखानावर केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या वक्तव्याचा आक्षेप व्यक्त करत राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली आहे. शिंदे गट आणि भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली जात असून त्यांनी माफी मागावी … Read more

Sambhaji Bhide | “शिवछत्रपतींना इंग्रजांच्या प्रसूतीगृहातून बाहेर काढा”; संभाजी भिडे पुन्हा बरळले!

Sambhaji Bhide | पुणे : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या आणखी एका वक्तव्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी जुन्नर येथे शिवप्रतिष्ठान च्या धारकऱ्यांच्या गटकोट मोहिमेच्या सांगता सभेत केलं आहे. “अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी … Read more

Girish Mahajan | “माझ्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचा…” ; शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या आरोपावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया

Girish Mahajan | जळगाव: पुण्यामध्ये झालेल्या शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी माफी देखील मागितली आहे. “पुरस्कार सोहळ्यात बोलताना माझ्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त … Read more