Uddhav Thackeray | “… परंतु ही राजकारण्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे”; इर्शाळवाडी दुर्घटनेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray | रायगड: दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील इर्शाळवाडी वस्तीवर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 98 लोकांना वाचवण्यात यश मिळाले आहे.
या ठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरूच आहे. अशात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज घटनास्थळी दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना दिलासा दिला आहे.
I am not politicizing this incident – Uddhav Thackeray
इर्शाळवाडीत दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना ते म्हणाले, “दरवेळी अशा प्रकारच्या दुर्घटना घडत असतात. मात्र आपण फक्त धावतो. घटनेवरून मी राजकारण करत नाही.
परंतु राजकारण्यांसाठी ही एक अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आजही अनेक वस्त्या आहेत, ज्या डोंगर उतारावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी आहे. त्या ठिकाणी कधीही दरड कोसळू शकते”
पुढे बोलताना ते (Uddhav Thackeray) म्हणाले, “या ठिकाणी जेव्हा मी दाखल झालो तेव्हा वीज नव्हती. त्यामुळे आम्ही वीज देण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या नैसर्गिक दुर्घटना कधीही होऊ शकतात म्हणून आपण जबाबदारी टाळू शकत नाही.
घटना घडण्याच्या आधीच पुनर्वसन व्हायला हवं होतं. त्याचबरोबर फक्त घर देऊन पुनर्वसन होत नाही. घरासोबत त्यांना नोकरी आणि रोजगार कसा मिळेल? हे देखील पहावं लागतं.”
“कुटुंबातील सदस्य म्हणून मी तुमच्यासोबत आहे. जागा निवडताना धोका होणार नाही अशीच जागा निवडा, अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो.
तुमच्या जीवाला परत धोका होता कामा नये. मी याबाबत सरकारशी बोलणार आहे. कारण आम्हाला ही वेळ परत कुणावर येऊ द्यायची नाही”, असही ते (Uddhav Thackeray) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | “2024 मध्ये अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत…”; अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त महत्वाची भविष्यवाणी
- Chhagan Bhujbal | “आदित्य ठाकरे 15 वर्षांपूर्वी येवल्यात आले…”; छगन भुजबाळांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं
- Nilesh Rane | “किती मोठे उपकार उद्धव साहेब आपले…”; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
- Eknath Shinde | राज्याच्या राजकारणात येणार नवीन भूकंप? CM शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर
- Sanjay Raut | “… म्हणून केंद्र सरकार मणिपूरकडे लक्ष देत नाही”; संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Y1aK3M
Comments are closed.