Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यामध्ये एकीकडे थंडी (Cold) चा कडाका वाढत चालला आहे. तर दुसरीकडे काही भागात जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. वातावरणामध्ये (Weather) वारंवार बदल होताना दिसत आहे. यामध्ये काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी पाऊस पडल्याचे चित्र समोर आले आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडणार आहे. कारण हाता-तोंडाशी आलेली पिकं या पावसामुळे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या तीन-चार दिवसापासून राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. विदर्भामधील काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे विदर्भातील शेतकरी संकटात सापडला आहे. कारण अचानक आलेल्या पावसामुळे पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तूर, हरभरा, गहू, कांदा इत्यादी पिकांना या पावसामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दोन दिवसापूर्वी दिला होता. दरम्यान, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. या ठिकाणी आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर जिल्ह्यात काही भागात दाट धुके पडल्याचे चित्र दिसले आहे.

विदर्भातील बुलढाणा आणि अमरावतीसह भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला होता. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडणार आहेत. कारण ढगाळ वातावरणामुळे पालेभाज्यांना मोठा फटका बसणार आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे.

राज्यामध्ये एकीकडे थंडीची हुडहुडी वाढत चालली आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहे. याचा परिणाम जनसामान्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर या अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे आधीच विदर्भातील शेतकऱ्यांची पिकं वाया गेली होती. आता पुन्हा एकदा या भागातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत रब्बी हंगाम देखील वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या