दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात सायंकाळी ५ पर्यंत ५३.५१ टक्के मतदान

मुंबई, दि. २६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सुरु झाले आहे. ८ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.५१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

वर्धा – ५६.६६ टक्के

अकोला – ५२.४९  टक्के

अमरावती – ५४.५० टक्के

बुलढाणा –  ५२.२४ टक्के

हिंगोली –  ५२.०३ टक्के

नांदेड –  ५२.४७ टक्के

परभणी -५३.७९ टक्के

यवतमाळ – वाशिम – ५४.०४ टक्के

०००

वंदना थोरात/विसंअ/