दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात अंदाजे ५९.६३ टक्के मतदान

मुंबई, दि. २६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

बुलढाणा –  ५८.४५ टक्के

अकोला – ५८.०९ टक्के

अमरावती – ६०.७४ टक्के

वर्धा – ६२.६५ टक्के

यवतमाळ – वाशिम – ५७.०० टक्के.

हिंगोली –  ६०.७९ टक्के

नांदेड –  ५९.५७ टक्के

परभणी – ६०.०९ टक्के

०००