दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४३.०१ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

वर्धा – ४५.९५ टक्के, अकोला -४२.६९ टक्के, अमरावती – ४३.७६ टक्के, बुलढाणा –  ४१.६६  टक्के, हिंगोली –  ४०.५० टक्के, नांदेड –  ४२.४२ टक्के, परभणी -४४.४९ टक्के, यवतमाळ – वाशिम -४२.५५ टक्के

०००

वंदना थोरात/विसंअ/