राज्यात तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६१.४४ टक्के मतदान

मुंबई, दि. ७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून अकरा मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
रायगड – ५८.१० टक्के
बारामती – ५६.०७ टक्के
उस्मानाबाद –  ६०.९१ टक्के
लातूर – ६०.१८ टक्के
सोलापूर – ५७.६१  टक्के
माढा – ६२.१७ टक्के
सांगली – ६०.९५ टक्के
सातारा –  ६३.०५ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-  ५९.२३ टक्के
कोल्हापूर –  ७०.३५ टक्के
हातकणंगले – ६८.०७ टक्के
000000