लोकसभा निवडणूक : सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान

मुंबई, दि.,७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
लातूर – ७.९१ टक्के
सांगली – ५.८१ टक्के
बारामती – ५.७७ टक्के
हातकणंगले – ७.५५ टक्के
कोल्हापूर -८.०४ टक्के
माढा -४.९९ टक्के
उस्मानाबाद -५.७९ टक्के
रायगड -६.८४ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-८.१७ टक्के
सातारा -७.०० टक्के
सोलापूर -५.९२ टक्के