लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.८३ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदारसंघात सकाळी  ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८३ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

वर्धा – १८.३५ टक्के

अकोला -१७.३७ टक्के

अमरावती – १७.७३ टक्के

बुलढाणा –  १७.९२ टक्के

हिंगोली –  १८.१९ टक्के

नांदेड –  २०.८५ टक्के

परभणी -२१.७७ टक्के

यवतमाळ – वाशिम – १८.०१ टक्के

0000