Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय! वर्सोवा-वांद्रे सी- लिंकला दिलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव

Eknath Shinde | मुंबई: आज (28 जुन) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ बैठक झाली आहे. या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या संबंधित देखील निर्णय घेण्यात आले आहे.

The Versova-Bandra C-link has been named as Swatantraveer Savarkar

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Eknath Shinde) महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. या बैठकीमध्ये वर्सोवा-वांद्रे सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव देण्यात आलं आहे. तर एमटीएचएल अटल बिहारी बाजपेयी स्मृती शिवडी-नाव्हा अटल सेतू असं नाव दिलं आहे. या बैठकीमध्ये साधारण 20 हून अधिक निर्णय घेण्यात आले आहेत.

भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द केले जाणार असल्याचा निर्णय देखील या बैठकीत (Eknath Shinde) घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडामुक्ती संग्रामाचं भव्य स्मारक उभारणार असल्याचं या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आलं आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी 3552 कोटी खर्च मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर देवळा आणि वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता (Eknath Shinde) देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3pilRIV