Hot Water Bath | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण गरम पाण्याने अंघोळ करत असतो. हिवाळ्यामध्ये थंडीचे वातावरण असल्यामुळे थंड पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. पण तुम्हाला माहित आहे का? थंड पाण्याऐवजी गरम पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. होय! खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हिवाळ्यामध्ये गरम पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, त्याचे गंभीर तोटे देखील होऊ शकतात. जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला पुढील तोट्यांना सामोरे जाऊ लागू शकते.
शरीर सुस्त होऊ शकते
हिवाळ्यामध्ये जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्याने आपले शरीर सुस्त होऊ शकते. परिणामी तुम्हाला दिवसभर थकवा आणि झोप येऊ शकते. गरम पाण्याने अंघोळ केल्यावर शरीराला खूप आरामदायी वाटते. मात्र, जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास थकवा आणि झोपेची समस्या निर्माण होऊ शकते.
उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते
जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील रक्तदाब अचानक वाढू शकतो. त्यामुळे हृदयरोगाशी संबंधित समस्या असलेल्या रुग्णांनी गरम पाण्याने अंघोळ करणे टाळावे.
कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होऊ शकते
गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. तुम्ही जर खूप गरम पाण्याने अंघोळ केली तर त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाते. परिणामी त्वचेवरील कोरडेपणाची समस्या वाढते. त्यामुळे तुम्ही जर जास्त गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने अंघोळ करत असाल, तर तुम्ही आंघोळीनंतर त्वचेला चांगले मॉइश्चरायझ केले पाहिजे.
केसांसाठी हानिकारक ठरू शकते
जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे केसांसाठी हानिकारक ठरू शकते. गरम पाण्याने केस धुतल्यास केसांमध्ये कोरडेपणाची समस्या निर्माण होते. जास्त गरम पाण्याने केस धुतल्यास केस कोरडे आणि कुरळे होण्याची शक्यता अधिक असते.
टीप: वरील माहितीसाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | राज्यात थंडीचा जोर ओसरणार, किमान तापमानात होणार वाढ
- Sanjay Shirsat | “नातू आहे म्हणजे अक्कल आली असं होत नाही”; संजय शिरसाट आदित्य ठाकरेंवर आगपाखड
- Shivsena | “उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे शिवसैनिक नसतात”; ठाकरे गटाच्या नेत्याची राणेंवर अप्रत्यक्ष टीका
- Nana Patole | राज्यपालांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर नाना पटोले म्हणाले, “त्यांचा राजीनामा घेऊ नये तर त्यांना…”
- Amol Mitkari | “उशीरा सुचलेले शहाणपण”; राज्यपालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावरुन अमोल मिटकरींची टीका