Nilesh Rane | “किती मोठे उपकार उद्धव साहेब आपले…”; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दुर्दैवी घटना घडली आहे. या ठिकाणी दरड कोसळलेली (Irshalwadi Landslide) असून अख्य गाव मातीच्या ढिगार्‍याखाली दबलं गेलं आहे.

या दुर्दैवी घटनेमध्ये आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 98 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तर अजूनही या ठिकाणी बचावकार्य सुरूच आहे.

रायगड जिल्ह्यात झालेल्या या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अनेक नेते घटनास्थळी दाखल झाले होते.

तर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) इर्शाळवाडीच्या दिशेने रवाना झाले आहे. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

ट्विट करत निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले, “बातमीत वाचलं… उद्धव ठाकरे ईरसालवाडीला भेट देणार, किती मोठे उपकार उद्धव साहेब आपले… मातोश्री बाहेरचे रस्ते, माती, झाडं धन्य झाली हे ऐकून.” निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटनंतर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde has accepted the guardianship of the accident children

दरम्यान, इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला (Nilesh Rane) आहे.

त्याचबरोबर दुर्घटनाग्रस्त मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं आहे. डॉ. नीलम गोऱ्हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या वतीनं  वाडीत जाऊन मुलांचं पालकत्व स्वीकारणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3O4igq1