Eknath Shinde | पहिल्याच पावसात सरकार वाहून गेले; ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

Eknath Shinde | मुंबई: शनिवारी (24 जून) मुंबईत पहिल्या पावसाने हजेरी लावली. पहिल्या पावसानंतर मुंबईत जागोजागी पाणी साचलं होतं. त्यामुळे मुंबईकरांकडून पहिल्यांदाच याबद्दल संताप व्यक्त केला गेला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

“शनिवारच्या पहिल्या पावसात सरकार वाहून गेले आहे. अजून पूर्ण पावसाळा बाकी आहे. मुंबईकरांना यादरम्यान किती आणि कोणत्या कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल हे सांगता येणे अवघड आहे. पहिल्या पावसानंतर मिंधे सरकारचे (Eknath Shinde) सगळे दावे वाहून गेले आहेत”, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

“मुख्यमंत्री मिंधे (Eknath Shinde) यांनी जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मुंबईकरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे वादे मिंधे-फडणवीस सरकारने जोराशोरात केले होते. मात्र हे वादे म्हणजे फेकूगिरी होती हे शनिवारी दिसून आलं आहे, असही या अग्रलेखात म्हटलं आहे.

Read Samana Editorial

शनिवारच्या पहिल्याच पावसात सरकार वाहून गेले. अजून तर संपूर्ण पावसाळा बाकी आहे. या काळात आणखी किती आणि कोणत्या प्रसंगांना तोंड देण्याची वेळ मुंबईकरांवर येईल, हे सांगता येणे कठीण आहे. कारण फक्त वल्गना, घोषणा आणि गर्जना यापलीकडे सरकारचे कुठलेच अस्तित्व नाही. पुन्हा त्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाचे प्रायश्चित्त घेण्याऐवजी ‘पावसाचे स्वागत करा, तक्रारी काय करता?” असा उफराटा सवाल जनतेलाच करणारे राज्यकर्ते मुंबईकरांच्या बोकांडी बसले आहेत. हा उद्दाम कारभार मुंबईतील मतदार उद्या पावसाच्या याच तुंबलेल्या पाण्यात बुडवतील हे विसरू नका!

रखडलेल्या मान्सूनने अखेर मुंबईसह महाराष्ट्रात आगमन केले आहे. राज्यात सर्वदूर हातपायदेखील पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला असला तरी इकडे मुंबईकर मात्र धास्तावला आहे. कारण शनिवारच्या पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडविली आहे आणि त्यात मिंधे सरकारचे सगळे दावे वाहून गेले आहेत. अस्मानी आणि सुलतानी या कोंडीत पुढील दोन तीन महिने आपला श्वास गुदमरणार, अशी भीती मुंबईकर जनतेला वाटत आहे. शनिवारी रात्री मुंबईत एका तासात 70 मिलिमीटर पाऊस कोसळला हे खरे असले तरी राणाभीमदेवी थाटात केलेले सरकारचे नालेसफाईचे दावे पोकळच ठरले. यावेळी पाणी तुंबणार नाही, मुंबईकरांना त्रास होणार नाही, असेही वादे मिंधे फडणवीस सरकारने जोरशोरात केले होते. मात्र हे वादे म्हणजे फेकूगिरी होती हे शनिवारी दिसले. 70 मिलीमीटर पावसामुळे जर मुंबईची ही दशा होत असेल तर पुढील दोन तीन महिन्यांत आपली काय दुर्दशा होणार? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. त्यात मुंबईकरांना आश्वस्त करण्याऐवजी त्यांनाच उफराटे सवाल करून धारेवर धरणारे राज्यकर्ते मिंधे सरकारच्या रूपाने महाराष्ट्रात आहेत. तुंबलेल्या पाण्यामुळे हवालदिल झालेल्या जनतेला ‘तक्रारी काय करता, पावसाचे स्वागत करा,’ असा

मुख्यमंत्री मिंधे यांनी दिला आणि जनतेच्या जखमेवर मीठच चोळले. बास्तविक, 24 तासांत तब्बल 1200 तक्रारी जनतेला का कराव्या लागल्या यावर मिंधे फडणवीस सरकारने चिंतन करायला हवे. पाणी तुंबणे आणि इतर गोष्टींबाबत आपण केलेल्या वल्गना पहिल्याच पावसाने पोकळ का ठरल्या, आपल्या कारभाराचे पितळ 70 मिलीमीटर पावसाने उघडे कसे पाडले याची लाज सरकारला वाटायला हवी. मात्र त्याऐवजी ‘पावसाचे स्वागत करा, तक्रारी करू नका,’ असे जनतेलाच सांगणे हा ‘चोर तर चोर, वर शिरजोर’ अशातला प्रकार झाला तुमचे काम चोख असते तर पहिल्याच पावसात 1200 तक्रारी करण्याची वेळ सामान्य मुंबईकरांवर आलीच नसती जलमय झालेल्या मीलन सब वेची पाहणी करण्याची नौटंकी करण्याची वेळ तुमच्यावरही आली नसती पुन्हा विरोधकांनी तुमच्या या शिरजोरपणावर बोट ठेवले तर त्यातही तुम्हाला तुमची बदनामी दिसते. मुळात पहिल्याच पावसाने तुमच्या दाव्यांचे झालेले वस्त्रहरण हे तुमचेच पाप आहे. निदान यापुढील काळात तरी ते कसे झाकता येईल आणि मुंबईकरांना कमीत कमी त्रास कसा होईल, याचा विचार करा. नुसत्या पाहणी दौऱ्यांनी ते साध्य होणार नाही. ती तुमची

आहेत. त्यामुळे तुम्हाला फार तर पाहणी दौऱ्याचे समाधान मिळेल, पण जनतेला कुठलाच दिलासा मिळणार नाही.. ‘जिकडे पाणी तुंबले तिकडच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू आणि जिकडे तुंबणार नाही तेथील अधिकाऱ्यांचा सत्कार करू,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले. आता याला ना ‘इपुरा’ म्हणता येईल, ना ‘गाजर’ ही फक्त बनवाबनवी आहे. मिंधे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात फक्त बनवाबनवीचाच खेळ सुरू आहे. तिकडे शेतकऱ्यांना आणि इकडे मुंबईकरांना पोकळ दावे आणि निष्फळ वादे यात झुलविण्याचेच उद्योग सुरू आहेत. शनिवारच्या पहिल्याच पावसात सरकार वाहून गेले. मिंधे सरकारच्या प्रशासकीय कारभाराची पुरती पोलखोल 70 मिलीमीटर पावसाने केली. अजून तर संपूर्ण पावसाळा बाकी आहे. या काळात आणखी किती आणि कोणत्या प्रसंगांना तोंड देण्याची वेळ मुंबईकरांवर येईल, हे सांगता येणे कठीण आहे. कारण फक्त वल्गना, घोषणा आणि गर्जना यापलीकडे सरकारचे कुठलेच अस्तित्व नाही. पुन्हा त्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाचे प्रायश्चित्त घेण्याऐवजी ‘पावसाचे स्वागत करा, तक्रारी काय करता?” असा उफराटा सवाल जनतेलाच करणारे राज्यकर्ते मुंबईकरांच्या बोकांडी बसले आहेत. हा उद्दाम कारभार मुंबईतील मतदार उद्या पावसाच्या याच तुंबलेल्या पाण्यात बुडवतील हे विसरू नका!

सौजन्य- सामना

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Jybwzh