PM Kisan Yojana | दिवाळीपूर्वी मिळू शकतो पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता; पाहा अपडेट

PM Kisan Yojana jpg PM Kisan Yojana | दिवाळीपूर्वी मिळू शकतो पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता; पाहा अपडेट

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. अशात शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री निधी सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा रुपये देते. दोन हजार रुपयांच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये सरकार ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचवते. […]

Ambadas Danve | खत, बियाणे डबलचा भाव, शेतकऱ्यांना मदत अर्धीच करता राव; अंबादास दानवेंचं सरकारवर टीकास्त्र

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे नुकसानाला सामोरे जावे लागले होते. छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड आणि जालना या भागातील प्रशासनाने नुकसान भरपाई म्हणून 1501 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, सरकारने फक्त 763 कोटी रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले आहे. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली … Read more

Weather Update | विदर्भात अवकाळी पावसाचं संकट कायम, तर पुण्यात वाढणार तापमानाचा पारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली. अशात पुढचे तीन दिवस पुण्यासह परिसरात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे शहरात दिवसभर आकाश निरभ्र राहील, असा अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भातील … Read more

Ajit Pawar | ‘शेतकऱ्यांनी नवं वर्ष कसं साजरं करायचं?’; अजित पवार राज्य सरकारवर आक्रमक

Ajit Pawar | मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळं (Unseasonal Rains) आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरकार आम्हाला सांगतंय पंचनामे करु, पण अद्यापही पंचनामे होत नसल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. अतिशय गंभीर परिस्थिती राज्यात शेतकर्‍यांची निर्माण झाली आहे आणि सरकार दुर्लक्ष करतेय त्यामुळे सभात्याग करत असल्याचे अजित पवार … Read more

Eknath Khadse | “तुम्ही काय दिवे लागले”; शेतकरी प्रश्नावरुन एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका

Eknath Khadse | मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. त्यातच आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकही मंत्री दिसत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं. खडसेंनी विधानपरिषदेत बोलताना राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. एकानाथ खडसेंची राज्य सरकारवर … Read more

Weather Update | राज्यात ‘या’ भागात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाने (Unseasonal rain) राज्यात थैमान घातले आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला … Read more

Auto Draft

Ajit Pawar | “कृषीमंत्री असे अकलेचे तारे तोडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात”; अजित पवारांची अब्दुल सत्तारांवर ताशेरे

Ajit Pawar | मुंबई : राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाल्यामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस, बाजारभाव आणि पंचनामे न झाल्याने शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी याच मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं आहे. यावर आता राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) … Read more

Eknath Shinde | कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eknath Shinde | मुंबई : राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या २ महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने चिंतेत आहे. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. “खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो सतर्क रहा! ‘या’ तारखेच्या आधी उरकून घ्या शेतीतील कामं

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. ऐन पीक काढण्याच्या वेळी राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा, द्राक्ष आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे, … Read more

Sushma Andhare | “शिमग्याला बोंब मारणं, सहज स्वाभाविक”; सुषमा अंधारेंची कदमांवर जहरी टीका

Sushma Andhare | अहमदनगर : राज्यात ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर आगपाखड केली. ठाकरे गटाने शिंदे गटावर सडकून टीका केली. त्यानंतर आता अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. या … Read more

Eknath Shinde | “अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा”; मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

Eknath Shinde | मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस (Untimely Rains) झाल्याने अनेक पिकांना फटका बसला आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. “नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा” “राज्यभरात काल ठिकठिकाणी … Read more

#Budget_2023 | अर्थसंकल्पातील सर्वसामान्यांसाठी काय तरतुदी?; महत्वाचे मुद्दे

#Budget 2023 : नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. 2024 च्या निवडणुकांपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील काही … Read more

Rain Update | शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ, राज्यात मराठवाड्यासह ‘या’ भागात अवकाळी पावसाचा इशारा

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी किमान तापमानात (Temperature) काही अंशाने घट झाली आहे. राज्यात पुढचे चार ते पाच दिवस साम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही … Read more

Weather Update | बदलत्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी संकटात, उत्पादनात घट होण्याची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये वारंवार वातावरणात (Weather) बदल होताना दिसत आहे. यामुळे कुठे थंडीचा (Cold) कडाका तर कुठे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. या बदलत्या हवामानाचा जनसामान्याच्या जीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. तर, या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची … Read more